Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यांच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी असा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे: अजित पवार

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (19:49 IST)
अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत पाच लाख 50 हजार नवीन सौर्य कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. याचबरोबर इतर अनेक योजना व तरतूदी असल्याचे सांगण्यात आले. या अर्थसंकल्पाबाबत काहींनी समाधान व्यक्त केले तर काहींनी टीका केली. 'राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. म्हणून त्यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याच मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना एक मजेशीर किस्सा घडला. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही खो-खो हसले.
 
मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरेंकडून या अर्थसंकल्पाला केवळ घोषणांचा पाऊस असे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांच्या टीकेवर तुमचे उत्तर काय? या वेळी अजित पवार यांनीच प्रश्नाचा ताबा घेतला आणि म्हणाले- "मी ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी असा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे. 'फार छान आहे, फार छान आहे' असं म्हणायचे. आता मी त्यांच्यासोबत नाही म्हणून ते असं म्हणत आहेत. त्याला काहीच अर्थ नाही." अजित दादांचे हे मजेशीर उत्तर ऐकून सोबत असलेले शिंदे आणि फडणवीस यांनाही हसू अनावर झाले. तसेच मागे उभे असलेले मंत्री शंभूराज देसाई हे देखील खो-खो हसले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

क्रिकेट सट्टेबाजीचे कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या, आरोपीला अटक

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

रात्री झोपेत छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी

पाटण्यात बोटीचा अपघात, 17 बुडाले, कुटुंबातील चार जण बेपत्ता

TDP ला लोकसभा अध्यक्षपद मिळाले नाही तर भारत आघाडी त्यांना पाठिंबा देईल, संजय राऊतांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments