Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता जीवनावश्यक वस्तूंमध्ये कांदा आणि बटाटाही

Webdunia
गुरूवार, 3 जुलै 2014 (11:15 IST)
केंद्र सरकारने साठेबाजां दणका देत शेतकर्‍यांचा  फायद्याचा निर्णय घेतला आहे. कांदा आणि बटाट्याचे दर नियंत्रणात  ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. सरकारने कांदा  आणि बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याखाली आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदा आणि बटाट्याच्या साठवणुकीची  मर्यादा निश्चित केली जाणार आहे. यामुळे निर्धारित केलेल्या  साठ्यापेक्षा अधिक साठा करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.  शेतकर्‍यांना आपला कांदा आणि बटाटा आता थेट बाजारात विक्रीसाठी  आणता येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात  आला आहे. सध्या देशात कांदा आणि बटाट्यांचा प्रचंड तुटवडा आहे.  त्यामुळे कांदा आणि बटाट्याचे दर मध्यमवर्गींच्या आवाक्याच्या बाहेर  गेले आहे. यामुळे साठेबाजांची नफेखोरी मोठ्याप्रमाणात सुरु आहे.  मर्यादा ठरल्यामुळे राज्य सरकारे साठेबाजांवर कठोर कारवाई करतील  अशी अपेक्षा कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments