Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील पेट्रोलपंप 26 ऑगस्टपासून बेमुदत बंद

Webdunia
शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (11:31 IST)
एलबीटी दर कमी केल्यास आणि एसएससी निर्णय होईपर्यंत व्हॅटचा दर कमी केल्यास राज्यातील पेट्रोल दर पाच ते सहा रुपयांनी कमी होतील. मात्र याबाबत राज्य सरकारशी वारंवार बोलणी करूनही सरकारने दाद न दिल्यामुळे राज्यातील पेट्रोलपंप डिलर्स 26 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
 
गेले सहा महिने सरकारच्या ही बाब निदर्शनास आणूनही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकाच्या हितासाठीच हा बंदचा निर्णय घेण्यात येत असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोद यांनी सांगितले.
 
राज्यातील जनतेसाठी पाच ते सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त व्हावे म्हणून पेट्रोलपंप मालक प्रयत्न करीत असतानाही सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 11 ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतरही सरकारने या संघटनेला चर्चेला बोलावले नाही. राज्यात महागाईचा भडका उडाला असताना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची संधी हे सरकार का गमावते आहे, असा सवाल करीत संघटनेने हे संपाचे हत्यार उपसले आहे. 
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments