Festival Posters

'अग्निहोत्र 2’ प्रेक्षकांचा निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली

Webdunia
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:28 IST)
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका  लवकरच निरोप घेत आहे. दहा वर्षांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.  त्याच पार्श्वभूमीवर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र 2’ मालिका 2 डिसेंबर 2019 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, प्रेक्षकांचा या नव्या पर्वाला प्रतिसाद न मिळाल्याने टीआरपीमध्ये ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा नर्णय घेतला.
 
‘अग्निहोत्र 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. विशेष म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत या मालिकेमार्फत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. .
 
‘अग्निहोत्र 2’ मालिकेचा शेवटचा भाग येत्या 9 मार्चला प्रसारित होणार आहे. त्यानंतर ‘वैजू नंबर 1’ ही मालिका सुरु होणार आहे. मालिका सुरु झाल्यानंतर दोन महिन्यातच ही मालिका बंद होत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया

सर्व पहा

नवीन

"घूसघोर पंडत" विरुद्ध योगी सरकारने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले; मायावती ब्राह्मणांबद्दल काय म्हटले?

बजेटचे पडसाद: कामवाली बाईला मालकीणने कसे अकडवले

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री अंजूला अटक

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

खिशात फक्त ५००० रुपये आहेत? 'या' ३ ठिकाणी तुम्ही फिरून येऊ शकता बजेटमध्ये!

पुढील लेख
Show comments