Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कारभारी लय भारी’चे राजवीर आणि प्रियांका ची जोडी स्वर्गात बनलेली एक परफेक्ट मॅच !

Webdunia
बुधवार, 2 डिसेंबर 2020 (13:42 IST)
‘कारभारी लय भारी’मधील मुख्य पात्र राजवीर आणि प्रियांकाच्या ऑनलाईन केमिस्ट्रीने यापूर्वीच प्रेक्षकांना थक्क करून सोडले आहे. ते एकमेकांसाठी आदर्श आणि परिपूर्ण आहेत, त्यांच्याविषयी इथे वाचा!
 
झी मराठीवरील नवीन मालिका ‘कारभारी लय भारी’ने मालिकेच्या पाटावर स्वत: ला एक अतिशय आश्वासक राजकीय-नाट्य  म्हणून स्थापित केले आहे आणि प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरत आहे. हा कार्यक्रम एक युवा राजकारणी राजवीरच्या जीवनावर आधारित आहे जो यशस्वी होण्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक अडथळ्यांना पार करतो आणि प्रियंका त्याच्या बाजूने उभी राहते. प्रियांका आणि राजवीरची कहाणी एखाद्या परीकथेपेक्षा वेगळी नाही आणि ती पहायला नक्कीच आवडेल.
 
आम्ही ‘कारभारी लय भारी’च्या जबरदस्त आकर्षक रोमँटिक कथानकाविषयी बोलताना प्रियांका आणि राजवीर यांच्या परफेक्ट केमिस्ट्रीविषयी बोलल्याशिवाय पुढे जाता येणार नाही स्वर्गात बनलेल्या जोडीसारखेच ते एकमेकांसाठी परिपूर्ण आहेत:
 
1. त्यांची पार्श्वभूमी समान आहे
प्रियांका आणि राजवीर हे दोघेही राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने आम्हाला आशा आहे की राजवीरच्या व्यवसायाबद्दल दोघांनाही चांगली समज आहे. प्रियांका स्वतः राजकारणी वडिलांकडे पहात वाढल्यामुळे तिला राजकारणाबद्दलची आतून माहिती आहे आणि राजवीरची व्यावसायिक वचनबद्धता इतर मुलींपेक्षा अधिक चांगली समजेल.
 
२. दोघांचे आदर्श कट्टर आहेत
या दोन्ही आघाडीच्या तारकांचे आदर्श खूप दृढ आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबिय हीच त्यांची प्राथमिकता आहे. ते दोघेही खूप उपयुक्त आणि नि: स्वार्थ आहेत आणि आपल्या प्रियजनांना सुरक्षित आणि आनंदी ठेवण्यासाठी काही प्रमाणात जाईल. दोघांनी हे सिद्ध केले आहे की त्यांनी इतरांच्या गरजा स्वत: वर ठेवल्या आहेत आणि म्हणूनच ते एकमेकांसाठी परिपूर्ण असतील.
 
3. त्यांच्यात विश्वास आणि समजूतदारपणा आहे
हे खरं आहे की कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. राजवीर आणि प्रियांकाच्या बाबतीत देखील हे खरे आहे दोघांमध्ये प्रचंड विश्वसाचे नाते आहे. जे नुकत्याचे आलेल्या प्रोमोमध्ये देखील आपल्याला पाहता येईल. जोरदार पाऊस पडत असतानाही प्रियांकाने राजवीरवर विश्वास ठेऊन आपल्या लग्नासाठी वेळेत तयार होण्यावर भर दिला आणि भटजींना लग्नाचे विधी सुरुवातीपासून घेण्यास सांगितले.
 
4. ते एकमेकांसोबत व्यक्त होण्यासाठी/ कॉल करण्यासाठी मागेपुढे पहात नाहीत
राजवीर आणि प्रियांका एकमेकांसोबत बोलण्यास व्यक्त होण्यास मागेपुढे पहात नाहीत. ते एकमेकांना कधीही कॉल करून मोकळेपणाने चर्चा करतात, त्यामुळे त्यांच्या नात्यात ही स्पष्टता आहे. यामुळे आशा आहे की त्यांचे नाते महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच ते एकमेकांसाठी परिपूर्ण आहेत.
 
5. ते एकमेकांवर खरोखर प्रेम करतात
कोणत्याही नात्यात प्रेम अत्यंत महत्त्वाचे असते असे म्हणतात. प्रोमोवरून आम्हाला हे कळते की भविष्यात ते एकमेकांवर खूप प्रेम करणार आहेत, हे स्पष्ट आहे की आताही सर्व थट्टा मस्करी आणि गैरसमजांमध्ये राजवीर आणि प्रियांका यांच्या मनात एकमेकांबद्दल एक हळवा कोपरा आहे आणि प्रेक्षक हा हळवा कोपरा कसा उमलतो आणि ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  
 
‘करभारी लय भारी’ मालिकेच्या अधिक माहितीसाठी, झी 5 ला भेट द्या आणि मिळावा आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स एक दिवस आधी!
 
प्रोमो लिंक:
https://f.io/h4K9ouef

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

सिद्धयोगी मकरंद देशपांडे‘अल्याड पल्याड’ चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत

पुढील लेख
Show comments