Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाजीप्रभू देशपांडे शौर्यगाथा दर्शविणारा चित्रपट 'पावनखिंड'चा ट्रेलर रिलीज

pawankhind-movie-trailer-review
Webdunia
गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (20:33 IST)
हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट पावनखिंड हा अंगावर शहारा आणणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर असून त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजीराजेंच्या इतिहासावर आधारित असून आपल्या लाडक्या महाराजा छत्रपतींच्या सैन्यात 300 मावळांसह सिद्धी जौहरला खिंडीत रोखून धरणारे तसेच युद्धात आपल्या प्राणाचे बलिदान करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या चित्तथरारक पराक्रमावर आधारित असलेला हा चित्रपट अक्षरश : अंगावर शहारे आणणारा आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, दिप्ती के, अभिनेता चिन्मय मांडलेकर हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. 
 
चित्रपटाचा ट्रेलर म्हणजेच चित्रपटाची छोटीशी झलक असते. या ट्रेलवरूनच चित्रपटात काय असणार आहे किंवा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याची एक साधारण कल्पना आपल्याला मिळते. परंतु पावनखिंडचा ट्रेलरच इतका भव्य आहे कि यावरूनच आपण अंदाज लावू शकतो कि दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आणि त्याच्या टीमने आपल्यासाठी किती भव्य कलाकृती या चित्रपटाच्या माध्यमातून बनवली आहे. याशिवाय सिनेमाची सिनेमॅटोग्राफी देखील या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार हे ट्रेलरमधून जाणवतेच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला

जातीभेदक वक्तव्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत,मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

जाट चित्रपटाच्या वादावर जालंधर पोलिसांनी कारवाई केली, सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स कसे वाढवायचे असे विचारले, चाहते म्हणाले रेखासोबतचा सेल्फी टाका

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

Joke: न्हाव्याने असे काय म्हटले की बंडोपंत कासावीस झाले

रितेश देशमुखच्या चित्रपटाचे शूटिंग करणाऱ्या डान्सरचा नदीत बुडून मृत्यू

शांत खोऱ्यात वसलेले मंदिर जिथे देवी पार्वतीने भगवान गणेशला द्वारपाल बनवले होते

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

पुढील लेख
Show comments