suvichar

प्रेमाला जात नसते मांडणारे स्टार प्रवाहचे ‘पुढचे पाऊल’

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:36 IST)
स्टार प्रवाहवरच्या ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत सध्या सुरु असलेल्या एपिसोडिक कथेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.अक्कासाहेबांच्या कोल्हापुरात सत्यजित  आणि तेजस्विनीची बहरणारी ही प्रेमकथा वेगळी आहे.
 
कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं.  जात बघून प्रेमात पडता येत नाही. पण अशा प्रेमाचे लग्नात रुपांतर होताना होणारा संघर्ष आज आधुनिकतेच्या जगातही कायम आहे. हा संघर्ष टाळता येऊच शकणार नाही का? हा महत्वाचा प्रश्न खूप संयत आणि वास्तवदर्शी पद्धतीने या मालिकेतून उलगडत आहे.विशेष म्हणजे प्रगत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातले हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे,पण ते मांडताना कुठलाही फिल्मीपणा टाळून ‘पुढचे पाऊल’ या वास्तवावर एक वेगळा दृष्टीकोन मांडते. मालिका विश्वात दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अक्कासाहेबांचे हे ‘पुढचे पाऊल’ म्हणूनच वेगळे ठरते आहे.
 
संकटातून मार्ग काढणाऱ्या,प्रश्नांची अचूक उकल करणाऱ्या  अक्कासाहेब,सत्यजित  आणि तेजस्विनीच्या प्रेमकहाणीत नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अक्कासाहेबांच्या सरदेशमुख कुटुंबासोबत श्रीकांत देसाई,मयूर खांडगे,आरती मोरे,अमित खेडेकर,संदीप जुवाटकर,नीता वझे,फ्रान्सिस ऑगस्टिन या अभिनयसंपन्न कलाकारांच्या सहभागाने हा कथाभाग विशेष रंगतो आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

इराण-इस्रायल युद्धादरम्यान कुवेतमध्ये अडकलेली उर्वशी रौतेला विमानात रडू लागली

Best places to visit with kids परीक्षा संपल्यानंतर मुलांसोबत भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणे

ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य कलाकार अमोल पालेकर यांना मेटा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली

पाकिस्तानात बंदी घातली तरी काही फरक पडत नाही, धुरंधर २ च्या आधी आदित्य धर यांचे विधान पुन्हा चर्चेत

पुढील लेख
Show comments