rashifal-2026

'मुळशी पॅटर्न'नंतर आता 'रेती पॅटर्न'

Webdunia
सोमवार, 17 डिसेंबर 2018 (13:22 IST)
सध्या राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटावर सुरुवातीला बरीच टिकाटिप्पणी झाली पण जेव्हा चित्रपटगृहांत तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित सहकुटुंब पाहता येईल असा चित्रपट प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा चित्रपट, त्याचे कथानक, संवाद यांसोबतच आणखीएका गोष्टीने लोकांची मनं जिंकली आहे ती म्हणजे प्रवीण तरडे यांची बेधडक वक्तव्यं आणि मतं. शेतकर्‍यांवर होणारा अन्याय, विकासांचे पर्याय शोधताना शेतकर्‍यांचा न केलेला विचार, तहसीलदारांवर होणारे हल्ले यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात आपल्या चित्रपटांतून सामाजिक मद्यांना अधोरेखित करणार असल्याचं सांगतानाच 'मुळशी पॅटर्न'नंतर आता  'रेती पॅटर्न' घेऊन येणार असं प्रवीण तरडे म्हणाले. देशाचा विकास करताना आपण शेतकर्‍यांचा विचारच करत नाही ही आपली खरी समस्या आहे. माझा चित्रपट हा शेतकर्‍यांना सजग करेल. शेती ही विकण्यासाठी नव्हे तर राखण्यासाठी असते असे संवाद यामध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ यांची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांच्या डेटिंगनंतर अर्जुन रामपालने प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स शी साखरपुडा केला

घोड्याच्या नालसारखा आकार आणि बदलत्या रंगांसाठी प्रसिद्ध चित्रकूट धबधबा

75व्या वाढदिवसानंतर, रजनीकांत कुटुंबासह तिरुपतीला पोहोचले

सलमान खान २५ वर्षांपासून बाहेर डिनरला गेला नाही, व्यस्त वेळापत्रकामागील वेदना उघड केल्या

पुढील लेख
Show comments