Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:01 IST)
रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. 
 
आयसीसीने या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत वाद घालणाऱ्या 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
 
बांगलादेशकडून तौहीद हृदॉय, शमिम हुसैन आणि रकीब उल-हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई केली गेली आहे. या पाचही खेळाडूंवर आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 4 ते 10 सामन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे. 
 
सामना रंगतदार झाला असला तरी खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणं, प्रतिस्पर्ध्यांचं अभिनंदन करणं हे महत्वाचं असतं. मात्र अंतिम सामन्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे सर्व नियमांचा भंग झाला. यामुळे ICC कडून कारवाई करण्यात आली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments