rashifal-2026

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (13:56 IST)
भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात झालेल्या या स्पर्धेच्या आयोजनातून बीसीसीआयही मालामाल झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बीसीसीआयने तब्बल 4 हजार कोटी रूपयांची कमाई केली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. कमाईच्या बाबतीतच्या बीसीसीआय  मालामाल झाले नसून गेल्या हंगामाच्या तुलनेत आयपीएलचे सामने टीव्हीवर पाहणार्या प्रेक्षकसंख्येतही 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
धुमाळ यांनी बीसीसीआयने कमावलेल्या 4 हजार कोटींचे वर्गीकरण करुन सांगायला नकार दिला. दुबई, अबुधाबी आणि शारजा या तीन मैदानांवर आयपीएलचे सामने रंगले. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अनेकांनी आम्हाला आयपीएलचे आयोजन करु नका असा सल्ला दिला. आमच्यातही थोडे संभ्राचे वातावरण होते. खेळाडूंना काही झाले तर काय करायचे ही भीतीमनात होती. परंतु जय शहा हे ठाम होते आणि स्पर्धा यशस्वीरीच्या पार पडली जाईल असा त्यांना विश्वास होता.
 
मेल आयपीएल हंगामाच्या तुलनेत बोर्डाने आपले खर्च 35 टक्क्यांनी कमी केले. या  काळातही आम्ही 4 हजार कोटींची कमाई केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीच्या सामन्याला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. जे सुरुवातीला आमच्यावर शंका घेत होते, त्यांनी नंतर येऊन आमचे आभार मानले. यंदाची स्पर्धा झाली नसती तर क्रिकेटपटूंनी एक वर्ष गमावले असते असेही धुमाळ म्हणाले.
 
यूएई व श्रीलंका अशा दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएल आयोजिण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु याआधी यूएईने आयपीएलच्या  काही सामन्यांचे आयोजन केले होते. ज्यामुळे बीसीसीआयने यूएईला पसंती दिली. खेळाडूंच्या सुरक्षिततेपासून ते जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यापर्यंत बीसीसीआयच्या अधिकार्यांनी सातत्याने फोन, व्हर्चुअल मिटिंग करत या सर्व गोष्टी जुळवून आणल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व बाबतीत मदत केलेल्या यूएई क्रिकेट बोर्डाचेही धुमाळ यांनी आभार मानले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा सामना या दिवशी खेळणार

SL vs AUS : श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला आठ विकेट्सने हरवले

रशीद खान टी-२० क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवून सुपर 8 मध्ये प्रवेश केला

IND vs PAK : पाच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार, सामना किती वाजता होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments