Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट देशद्रोही, कारण विदेशात जाऊन लग्न केलं

विराट देशद्रोही  कारण विदेशात जाऊन लग्न केलं
Webdunia
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्ना विषयी आता मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचं अजब वक्तव्य समोर आलं आहे. मध्यप्रदेशातील गुणा येथील आमदार पन्नालाल शाक्य शाळेतील विद्यार्थ्यांना देशाशी एकनिष्ठ राहण्यावर व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला. परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांनी कोहलीवर तोंडसुख घेतलं.
 
''देशासाठी खेळणाऱ्या विराट कोहलीने परदेशात जाऊन अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. याला देशभक्ती नाही म्हणत. देशातला पैसा परदेशात खर्च करणं चुकीचं आहे. तुम्ही देशासाठी खेळता, पैसा कमावता आणि लग्न परदेशात जाऊन करता. याला देशभक्ती नाही, देशद्रोह म्हणातात'', असं पन्नालाल शाक्य म्हणाले. पन्नालाल शाक्य यांनी विराट आणि अनुष्काला पैशाचा सदुपयोग करण्याबाबत सल्लाही दिला. ''विराट आणि अनुष्काने लग्नासाठी जेवढा पैसा खर्च केला, त्यात किती गरीबांना रस्ता आणि वीज मिळाली असती. दोघांनीही लाखो चाहत्यांचा अपमान केला आहे'', असं ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

CSK vs RCB Playing 11: आरसीबी सीएसकेला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल, प्लेइंग 11 जाणून घ्या

SRH vs LSG : लखनौने हैदराबादला पाच विकेट्सने हरवले,सामना 5 गडी राखून जिंकला

RR vs KKR Playing 11: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघ आता बुधवारी एकमेकांसमोर येतील

RR vs KKR: सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात

GT vs PBKS: पंजाब किंग्जने स्पर्धेत गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments