Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने टेस्ट सीरिज ३-१ ने गमावली

Webdunia
सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (09:18 IST)
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. याचबरोबर भारतानं ५ टेस्ट मॅचची सीरिज ३-१नं गमावली आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन करत मॅच २०९ रननं जिंकली होती. पण आता चौथ्या टेस्टमध्ये पुन्हा भारतानं निराशा केली. मोईन अलीच्या फिरकीसमोर भारतीय बॅट्समननी नांगी टाकली. त्यानं इंग्लंजकडून सर्वाधिक चार बळी घेतले. भारताचा दुसरा डाव १८४ रनवरच आटोपला. आणि भारतीय टीमला ६० रननी पराभव सहन करावा लागला.
 
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाला विजय साकारुन देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. विराट कोहलीनं ५८ धावा आणि अजिंक्य रहाणेनं ५१ धावांची खेळी केली. विराट आणि अजिंक्यचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला आपली छाप सोडता आली नाही. आता ७ सप्टेंबरपासून पाचव्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments