Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत

Webdunia
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननी निसटता पराभव झाला आहे. विजयासाठी १७४ रनची आवश्यकता असताना भारताला १६९/७ एवढाच स्कोअर करता आला. पाऊस पडल्यामुळे ही मॅच १७ ओव्हरची झाली.  १७४ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा ७ रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं ४२ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवनच्या रुपात भारताला लागोपाठ ३ झटके लागले.
 
 दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनं पुन्हा एकदा भारतीय इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं १३ बॉलमध्ये ३० रनची वादळी खेळी केली. कार्तिक आणि पंत भारताला विजय मिळवून देतील अशी अपेक्षा होती पण ऋषभ पंत चुकीचा फटका मारून आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. पण मार्कस स्टॉयनिसनं पहिले कृणाल पांड्या आणि मग दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेतली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

PBKS vs KKR : पंजाबने कोलकाता विरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून इतिहास रचला

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने T20 इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत 8 गडी राखून सामना जिंकला

KKR vs PBKS Playing 11 : आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने होतील,प्लेइंग 11जाणून घ्या

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments