इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. पहिल्या 3 सामन्यांसाठीच्या 18 जणांचा संघामध्ये जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला विश्रांती दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कुमारला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही. संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोन यष्टीरक्षकांना स्थान दिले आहे.