Festival Posters

आयसीसीच्या नव्या नियमांवर भारतीय समालोचक नाराज

Webdunia
बुधवार, 27 मे 2020 (14:37 IST)
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गेले दोन महिने क्रिकेटचे सामने बंद आहेत. आता हळूहळू क्रिकेट पुन्हा रूळावर आणण्याचे आयसीसीचे प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात आयसीसीकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सराव सत्र घेणे किंवा क्रिकेट सामने खेळवणे अशा दोन्ही बाबींसाठी आयसीसीने काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमांमध्ये खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यावरून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने प्रश्न उपस्थित केले आहेत. आयसीसीने तयार केलेली नियमावली ही खूपच अपरिपक्व वाटते. कोरोनाबाबतचे कोणतेही नियम आताच ठरवणे हे घाईचे ठरेल, कारण परिस्थिती रोज बदलते आहे. सामना सुरू असताना चेंडूला स्पर्श झाला की प्रत्येक वेळी हात धुणे किंवा सॅनिटाइझ करणे हे निव्वळ अशक्य आहे.
 
तसेच जर संघाला सामन्याआधी पुरेशा दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार आहे आणि सामने खेळताना ती जागा स्वच्छ केली जाणार आहे, तर सामना सुरू असताना अतिरिक्त नियमांची गरज काय? अन्यथा क्वारंटाइन राहण्याला काहीच अर्थ उरणार नाही, अशा शब्दात आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली.
 
नियमावलीत म्हटल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन मैदानावर केले जाईल. पण त्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणे शक्य आहे का? जास्त नियमांचे कुंपण घातले तर खेळातील मजा नाहीशी होईल, असे चोप्राने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

LSG vs PBKS :पंजाबने लखनौला सात गडी राखून पराभूत करत विजय मिळवला

LSG vs PBKS : आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स मध्ये खेळला जाणार

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

विश्वचषक संघातील भारतीय क्रिकेटपटू विजय शंकर यांनी निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments