Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा सर्वस्वी निवड समितीचा निणर्य, ‘स्टार’ला बीसीसीआयचे उत्तर

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (15:29 IST)
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याला आशिया चषक स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हा निर्णय हा बीसीसीआयच्या निवड समितीचा आहे. कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे आणि कोणत्या खेळाडूला विश्रांती द्यायची, हा सर्वस्वी निवड समितीचा निणर्य असतो. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला स्पष्ट केले.
 
या स्पर्धेसाठी विराटला वगळण्यात आल्याबाबत स्टार वाहिनीने आशियाई क्रिकेट परिषदेला नाराजी पत्र पाठवले आहे. २९ जून २०१७ मध्ये आशिया चषक स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार झाला. त्यावेळी सहभागी प्रत्येक संघ स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करतील, असे आश्वासन देण्यात आले होते. विराट कोहली हा सध्या आघाडीचा आणि यशस्वी फलंदाज आहे. त्यामुळे त्याला अशा स्पर्धांमधून वगळल्याने आमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, अशा आशयाचे पत्र ‘स्टार’कडून आशियाई क्रिकेट परिषदेला पाठवण्यात आले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

IND vs ENG: भारताने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग 7वी एकदिवसीय मालिका जिंकली

IND vs ENG:घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असणार

ट्रेंट बोल्टने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू बनला

श्रीशांतला केरळ क्रिकेट असोसिएशनने कारणे दाखवा नोटीस बजावली

IND vs ENG: कटक वनडेपूर्वी भारताला आनंदाची बातमी, कोहली खेळणार हा सामना

पुढील लेख
Show comments