Festival Posters

भारतीय संघ विराटवर अवलंबून नाही

Webdunia
गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने धावा करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म सध्या हरवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या भवितव्याबद्दल अनेकांना चिंता वाटत आहे. मात्र भारतीय संघात अनेक गुणवान खेळाडू असून विराटच्या अपयशाची भरपाई करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याची ग्वाही भारताचे प्रुडेन्शियल विश्‍वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी दिली आहे.
 
दिल्लीतील मॅडम तुसॉ वॅक्‍स म्युझियम येथे कपिल देव यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले, त्या वेळी कपिल देव बोलत होते. विराट कोहलीच्या ढासळत्या फॉर्मचा भारतीय संघाच्या कामगिरीवर किती परिणाम होईल, असे विचारले असता ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटीपूर्वीही हाच प्रश्‍न विचारण्यात येत होता. प्रत्यक्षात काय घडले हे आपण पाहिलेच. विराट अपयशी ठरला तर काय होईल असे विचारून आपण संघातील अन्य खेळाडूंवर अन्याय करीत आहोत.
 
दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास विराट हा खूप मोठा खेळाडू आहे. त्यालाही आपल्या अपयशाची जाणीव आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याचाही प्रयत्न चालू असेलच. कधी आणि कसे खेळायचे हे त्याला बरोबर माहीत आहे, असे सांगून कपिल देव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाची कामगिरी चांगलीच होत आहे. त्यांच्यात चॅम्पियन्स करंडक जिंकण्याची क्षमता निश्‍चितच आहे. परंतु स्पर्धेदरम्यान कागदावरील नियोजन मैदानावर प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना कितपत यश मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
 
कोणत्यीाह एका गोलंदाजावर संघ अवलंबून नसतो, असे सांगून कपिल देव म्हणाले की, एका गोलंदाजाने कितीही चांगली कामगिरी केली तरी तो एकटा जिंकत नसून संपूर्ण संघ विजयी होत असतो. सर्व खेळाडूंनी एकत्रितपणे सांघिक कामगिरी करण्याकडे लक्ष दिल्यास जिंकण्याची शक्‍यता वाढते. माझ्या मते आजचे युवा खेळाडू आमच्यापेक्षा अधिक व्यावसायिक आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी केलेल्या संघनिवडीवर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी युवा खेळाडू निवडले असते, तर अनुभवींना का वगळले असे तुम्ही विचारले असते. माझे मत वेगळे असू शकेल. परंतु त्यामुळे संघनिवडीवर टीका करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

डॅरिल मिशेलने इतिहास रचला आणि तो भारतात भारतीय संघाविरुद्ध असा पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला

DCW vs RCBW: आरसीबीने दिल्लीचा आठ विकेट्सने पराभव केला, बेंगळुरूने सलग चौथा विजय नोंदवला

IND vs BAN: पावसामुळे झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले

वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकत उल्लेखनीय कामगिरी केली; हा टप्पा गाठणारा तिसरा सर्वात जलद भारतीय ठरला

आरसीबीने गुजरातचा 32 धावांनी पराभव केला, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले

पुढील लेख
Show comments