खेळापेक्षा दोन देशांच्या अस्मितेच्या मुद्यावर फिरणार्या भारत आणि पाकिस्तनमधील क्रिकेट सामन्यांच्या मालिकेचा निकाल अखेर लागला आहे.
ही बहुचर्चित आणि नवा अध्याय जोडणारी क्रिकेट मालिका २४ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत श्रीलंकेत होणार आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि दोन टी- २० सामने खेळविण्यात येतील. ही मालिका श्रीलंकेत खेळविण्यात येणार असून, येथूनच दोन्ही संघ त्यांच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्यास रवाना होतील. दरम्यान या दौर्यास पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असून, भारत सरकारही येत्या आठवड्यात परवानगी देईल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.