भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतास सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणारा कर्णधार बनला आहे. याअगोदर हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावांवर होता.
धोनीने ४५ कसोटीत देशाचे नेतृत्व केले असून गांगुलीने ४९ टेस्ट मध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. यामधून धोनीने २२ कसोटी विजय साकर केले असून गांगुलीने २१ कसोटीत विजय संपादन केला आहे.