Festival Posters

पाणी वाचवा जीवन वाचवा

Webdunia
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (12:46 IST)
पाणी हे जीवन आहे. हे आपण सगळेच ऐकतच येत आहोत. पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही. सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. हे अमूल्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. आज जर आपण पाणी वाचवले नाही तर येणारी पिढी पाण्यासाठी तरसेल. पाण्याचे अपव्यय केल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात. पाणी वाया जात या कडे कोणाचेच लक्ष नसते. अंघोळी साठी शॉवर चा वापर करतात. त्यामुळे खूप पाणी वाया जात. असे करू नये. इथे आपण पाणी वाया घालवतो आणि दुसरी कडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात.
 
पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार, शेती साठी पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर पीक पण नसेल मग आपण काय खाणार? आपल्या दैनंदिनी व्यवहार देखील पाण्यानेच होतात. पाणी आपल्या जीवनासाठी अति आवश्यक आहे माणूस आपल्या जीवनात काही नसेल तरी राहू शकतो पण प्राणवायू ऑक्सिजन, पाणी आणि अन्न या शिवाय जगू शकत नाही पाणी प्रदूषणाच्या आजारांमुळे लोक मरण पावतात. म्हणून पाणी प्रदूषण होण्यापासून रोखले पाहिजे.
 
पावसाच्या पाण्याला संरक्षित करून आपण पाणी वाचवू शकतो. आंघोळ करताना शॉवर एवजी बादलीचा वापर करू शकतो. पाण्याचे काम झाल्यावर नळ घट्ट बंद करू शकतो. झाडे लावून आपल्या पर्यावरणाला संरक्षित ठेवू शकतो. सार्वजनिक स्थळांवर वाहत असलेल्या नळाला बंद करून पण पाण्याला वाचवू शकतो. लक्षात 
 
ठेवा पाणी देवाची दिलेली देणगी आहे. त्याचा अपव्यय करू नका. पृथ्वीवर याच्या शिवाय जगण्याची कल्पना देखील करता येणं अशक्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा -पाणी नाही तर आपण नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

नीट पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधारला पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक

आषाढी वारीसाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क,जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली

अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत योजना राबविण्यात आली, १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत देणार

विदर्भात १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, शिक्षण विभागाला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments