Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष

Webdunia
सोमवार, 27 मे 2024 (11:30 IST)
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ ला अलाहाबाद येथे झाला. हॅरो व केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेऊन नेहरू १९१२ मध्ये बार एट लॉची परिक्षा उत्तीर्ण झाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली न करता स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले. 
 
गांधीजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. १९१२ मध्येच ते कॉंग्रेसचे सदस्य झाले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्यांमच्या मोर्चाला संघटित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. १९२८ मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या आंदोलनत ते जखमी झाले होते. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहातही ते सहभागी झाले होते. त्यांना अटक करून सहा महिन्यांसाठी त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले. १९३५ मध्ये झालेल्या अटकेवेळी त्यांना अल्मोडा येथील तुरूंगात ठेवले होते. तिथे त्यांनी आत्मचरित्र लिहिले.
 
१९४२ च्या आंदोलनात ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना अहमदनगरच्या तुरूंगात ठेवण्यात आले. तेथून १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी नऊ वेळा तुरूंगवास भोगला.
 
स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या हंगामी सरकारमध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. २७ मे १९६४ ला त्यांचे निधन होईपर्यंत ते या पदावर होते. नेहरूंच्या कार्यकाळात लोकशाही मजबूत करणे, देश व घटनेतील धर्मनिरपेक्षता कायम करणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आदी कामे करण्यावर भर देण्यात आला.
 
त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. पंचशील तत्वेही त्यांनी मांडली. १९५४ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत तटस्थ राष्ट्रांचा गट बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मेलबर्नहून दिल्लीला येणाऱ्या विमानात भारतीय तरुणीचा मृत्यू

Weather Update News :राज्यातील या भागांना अति मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई महानगर क्षेत्रात होर्डिंगसाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार - उदय सामंत

फोनपे वापरकर्त्याची 5 लाख रुपायांची फसवणूक, आरोपींना अटक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटींमुळे विधवा आणि निराधार महिलांना लाभ मिळणार नाही?

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या 'हिंदू' संदर्भातील विधानावरुन गदारोळ, पंतप्रधान मोदी आणि शाह काय म्हणाले?

हिंदू समाजाला हिंसक म्हटल्या प्रकरणात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा तुरुंगवास

अमेरिकेच्या सिनसिनाटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोळीबार, तीन ठार

वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना भारतात नाही तर या देशात होणार,गुकेशचा सामना लिरेनशी

पुढील लेख
Show comments