Marathi Biodata Maker

महात्मा ज्योतिबा फुले यांचा संक्षिप्त परिचय

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (10:00 IST)
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२० रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आई वडिलांचे नाव गोविंदराव व चिमणाबाई होते. त्यांचे कुटुंब उदार निर्वाहासाठी माळ्याचे काम करत असत. ते साताऱ्यामधून पुण्याला फुले आणून त्याचे गजरे बनवून विकायचे म्हणून ते फुले म्हणून ओळखले जात असे नंतर त्यांना फुले नावानेच संबोधित केले जात असे. 
 
बाल्यपणापासूनच त्यांची बुद्धी कुशाग्र व तल्लख होती. त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. ते कुशल विचारवंत, क्रांतिवीर, समाजसेवी, चांगले लेखक, व कुशल दार्शनिक होते. 
 
ते सन १८४० रोजी सावित्रीबाईशी विवाहबद्ध झाले. त्या काळी महाराष्ट्रात धर्मसुधारक आंदोलनाची तीव्रता होती, जातिप्रथेचा विरोध केला जात होता. त्या साठी प्रार्थना समाजाची स्थापना केली गेली त्याचे कार्यवाहक प्रमुख गोविंदराव रानडे आणिक आर जी भांडारकर होते.
 
त्या वेळी महाराष्ट्रात जातिवाद बरोबरच स्त्री शिक्षा सारखे गंभीर विषय ज्वलंतशील होते. महात्मा यांनी त्या कुप्रथेला संपविण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी स्त्री शिक्षेला महत्त्व देऊन पुण्यात प्रथम मुलींसाठी शाळा उघडून स्त्री शिक्षण सुरू केले. त्यासाठी त्यांना समाजात विरोध पत्करावा लागलाच पण त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण केले व समाजात एक नवीन आदर्श स्थापित केले. त्यांचे विचार सर्वत्र पसरू लागले.
 
अस्पृश्यता, जातीवाद व सर्वांना सामान अधिकार स्त्री पुरुष समानता ह्या मताचे ते होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्यांवर कार्य केले त्यासाठी त्यांना "महात्मा" असे नाव मिळाले त्यांना "महात्मा" म्हणूनच ओळखले जाते.
 
२८ नोव्हेंबर १८९० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. महात्मा फुले आज पण त्यांचे विचारायच्या रूपात जिवंत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने महागाई भत्ता वाढवला

Ashok Kharat case अशोक खरात ३० एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहणार; पोलीस पाचव्या प्रकरणात रिमांडची मागणी करणार

महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले-विरोधकांनी महिला शक्तीच्या वाढीला खीळ घातली, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील धर्मांतर आणि अमली पदार्थांच्या प्रकरणांवर उच्चस्तरीय बैठक बोलावली

LIVE: २० ते २२ एप्रिल दरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

पुढील लेख
Show comments