Marathi Biodata Maker

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार

Webdunia
सोमवार, 2 जुलै 2018 (09:04 IST)
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार आहे. त्या ऐवजी आता सर्व सदस्य सर्वसंमतीने ही निवड होणार आहे. साहित्य महामंडळाच्या घटनेतही दुरुस्ती करण्यात आली आहे. घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतरच हा निर्णय लागू होणार आहे. त्याचबरोबर आगामी ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा किंवा यवतमाळ या ठिकाणी होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणुक प्रक्रियेमुळे साहित्य संमेलनात अनेक चांगल्या साहित्यिकांना अध्यक्ष होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे राजकारण न होता चांगला साहित्यिक अध्यक्ष म्हणून निवडला जावा असे या मागचा उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे साहित्य संमेलनात होणारे वाद बंद होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या निर्णयावरच वाद नको निर्माण करायला असे देखील बोलले जात जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 15 व्यांदा तुरुंगातून सोडण्यात येणार, 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरलं

आमदार संजय मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मतदान केंद्रात अडथळा आणल्याचा खटला रद्द

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

पुढील लेख
Show comments