rashifal-2026

दुःख वाळुवर लिहायला शिकावे आणि चांगुलपणा दगडावर कोरायला!

Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (14:34 IST)
एकदा दोन मित्र वाळवंटातुन प्रवास करत असतात. प्रवास करत असताना एकदा त्यांच्यात काही कारणावरुन विवाद होतो. यामध्ये एक मित्र दुसऱ्याच्या थोबाडीत मारतो. मार खाल्लेला मित्र दुःखी होतो पण काहीही न बोलता तो वाळुमध्ये लिहितो, "आज माझ्या जिवलग मित्राने मला थोबाडीत मारले."
 
प्रवास करत करत ते पुढे जातच राहतात. त्यांना समुद्र लागतो. समुद्र बघुन ते त्यात स्नान करायचे ठरवतात. पण  मार खाल्लेला मित्र पाण्याच्या भोवऱ्यात अडकतो आणि बुडायला लागतो पण त्याचा मित्र त्याला वाचवतो. या प्रसंगातुन सावरल्यावर काही दिवसांनी तो दगडावर काही अक्षरे कोरतो.  "आज माझ्या जिवलग मित्राने माझे आयुष्य वाचवले." 
 
ज्याने त्याला मारले व वाचवले असते असा जिवलग मित्र त्याला विचारतो, "मी तुला दुःखी केल्यावर तु वाळुवर लिहिलेस आणि आता दगडावर कोरलेस असे का?"
 
मित्र उत्तरतो- 
"जेव्हा आपल्याला कोणी दुःखी करते तेव्हा ते वाळुवर लिहावे कारण क्षमेचा वाऱ्याने ते आपोआप पुसले जाते पण जर कोणी आपल्यासाठी चांगले केले तर आपण दगडावर कोरुन ठेवावे जेणे करुन कुठलाच वारा ते नष्ट करु शकणार नाही."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

LIVE: शिक्षक संघटनांचा सरकारविरुद्ध निषेध, अमरावतीतील सर्व शाळा बंद

पलाशशी लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाचा पहिला व्हिडिओ आला, साखरपुड्याची अंगठी गायब!

FIFA विश्वचषक 2026 च्या संघाची घोषणा, रोनाल्डो या गटात असेल

इंडिगो एअरलाइन्स संकट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

पुढील लेख
Show comments