Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपण देखील PM मोदींची दिवाळीला केवळ Made in India प्रॉडक्ट खरेदी करा अशी चिट्ठी शेअर केली असेल तर...सत्य जाणून घ्या

PM Narendra Modi
Webdunia
प्रत्येक दिवाळी येण्यापूर्वीपासूनच चायनीज लाइट्स आणि फटाक्यांचा बहिष्कार तसेच स्वदेशी सामान वापरण्याची अपील होत असते. यंदा सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावावर एक चिट्ठी व्हायरल होत आहे, ज्यात दिवाळीसाठी केवळ भारतात तयार होणारे प्रॉडक्ट्स खरेदी करण्याबद्दल अपील करण्यात आली आहे. या चिट्ठीत मोदींचे हस्ताक्षर देखील आहेत.
 
व्हायरल चिट्ठीत काय आहे-
 
चिट्ठीत लिहिले आहे- ‘माझे प्रिय भारतीय आपण केवळ एवढे करा की येणार्‍या दिवाळी सणाला आपल्या घरातील प्रकाश, सजावट आणि मिठाई या सगळ्यांसाठी केवळ भारतात तयार सामुग्री वापरा. आपण या प्रधान सेवकांची गोष्ट मान्य कराल अशी उमेद आहे. आपण लहान-लहान पावलांनी माझी साथ दिली तर मी वचन देतो की की आमचं भारत जागतील सर्वात पुढील रांगेत प्रथम स्थानावर उभे असेल'
 
खरं काय आहे- 
 
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या चिट्ठीची तपासणी करण्यासाठी आम्ही Yandex इमेज रिव्हर्स सर्च वापरले, तर आम्हाला पीएमओ द्वारे 2016 मध्ये केलेलं एक ट्विट सापडलं. त्यात माहीत पडले की सोशल मीडियात व्हायरल होत असलेली चिट्ठी बनावटी आहे.
 
पीएमओने लिहिले होते, ‘पीएमच्या ‘हस्ताक्षर’सह काही अपील सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. हे कागदपत्रे खरे नाही.
 
 
नंतर त्यांनी यावर खेद प्रकट करत स्पष्ट केले होते की ‘मला सूचना मिळाली आहे की हा संदेश पंतप्रधान मोदींचा नाही. मला या पोस्टवर दु:ख आहे. तरी वैयक्तिक रूपाने मी आपल्या देशात तयार उत्पादनांना प्राथमिकता देते. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.’
 
पीएम मोदी देखील भारतीय उत्पादांचे समर्थक असून अनेकदा त्यांनी खादी वापरण्यावर जोर दिलेला आहे. दिवाळीला कुंभारांकडून मातीचे दिवे आणि कळश खरेदी करण्याचा आग्रह करतात तरी ही चिठ्ठी मात्र फेक आहे.
 
वेबदुनियाला आपल्या तपासणीत सोशल मीडियावर पीएम मोदींच्या नावावर व्हायरल होत असलेली चिट्ठी फेक असल्याचे कळून आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत बजरंग दलावर एफआयआर दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाष्य केले, प्रशांत कोरटकर यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

Bank Holidays : एप्रिल मध्ये बँका 16 दिवस बंद राहतील सुट्ट्यांची यादी जाणून घ्या

ठाण्यात कर्जाच्या वादातून दुकानदाराचे अपहरण करून क्रूरपणे मारहाण

MI vs KKR: मुंबई संघ पराभवाची मालिका थांबवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध खेळेल

पुढील लेख
Show comments