Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋणानुबंध

Webdunia
बुधवार, 4 मार्च 2015 (15:35 IST)
दमयंती आल्या आल्या हताश होऊन मला विचारीत होती, ‘हे कसले ऋणानुबंध आहेत गं तिचे माझे?’ मी शांतपणे विचारले ‘कुणाचे? कशासंबंधी बोलतेस तू?’ ‘अगं सुनेचा फोन आला. दोघांची भांडणे झालीत. ती म्हणते, आई तुमच्या मुलाला समजवा. माझ्या पायानं लक्ष्मी आली. म्हणूनच भरभराट झाली तुमची. मलाच हिशेब विचारतो तुमचा मुलगा. मला 50 रुपये द्या. मी पंढरपूरच्या आश्रमात जाऊन राहाते’, हे ऐकून मला हसू आलं, ‘अगं, 9 लाख रुपये माहेरी देणारी, भावाला गाडी घेऊन देणारी, भावाच्या पोरीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण करणारी, हिच्याजवळ 50 रुपये नाहीत का? जिला आश्रमात राहायचं ती असं सांगून जात नाही. इथं इतकी चैनीला सोकावलेली तुझी सून माहेरीदेखील राहायची नाही. आहे काय माहेरी? दीड खोलीची जागा. हा पांढरा हत्ती 8 दिवस देखील पोसायची ताकद नाही त्यांची. ही नुसती धमकीची भाषा आहे. घाबरू नकोस?’ ‘अगं, ते मलाही माहीत आहे. आल्या दिवसापासून ओळखते तिला. पण मला प्रभाकरची काळजी वाटते गं. एवढा खोर्‍यानं पैसा मिळवतो पण काडीचं सुख नाही त्याला. एवढय़ा सगळ सुखसोयी आहेत, गाडी, बंगला, दागदागिने, वर्षातून दोनदा फॉरिनच ट्रीप, दर आठवडय़ाला स्वंपाकाला सुटी, नाश्तपासून बाहेरचं मागावाचं. लग्नानंतर 10 वर्षे मूल झालं नाही त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. उलट मूल झाल्यावर त्याचा त्रासच वाटायचा तिला. त्याला सांभाळायला रात्रीची एक बाई व दिवसाची एक बाई. बाळ रडायला लागलं तर मोलकरणीवर खेकसाची. मोलकरणी पण म्हणायच, इतक्या वर्षानी मूल झालं पण बाईला काही नाही त्याचं. जरा त्रास सोसत नाही हिला. बाई आहे की कोण?’
 
‘आता तर मुलाला शिकाला होस्टेलवर ठेवलं पुण्याला. घरात सगळ्या कामाला बाई. परत वॉचमनची बायको दिवसभर तैनातीला आहेच. तरी काय दुखतयं हिचं कळत नाही. आम्ही कोणी गेलेलं तर अजिबात खपत नाही. मुलाला म्हटलं, तूच येत जा बाबा कधी मधी भेटायला. तर असं आहे बघ. अगं बाई, मुलाला दु:ख झालं तर आईचं काळीज पण दुखतं गं!’ यावर काय बोलावं तेच सुचेना. मी म्हणाले, ‘असतो एकेकाचा स्वभाव. त्याला  औषध नसतं म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तू काही काळजी करू नकोस. प्रभाकरला आता त्याची सवय झाली. त्याचे नि तिचेही असे ऋणानुबंध असतील आणि ते तोडताही येत नाहीत. सोसावे लागतात. देव कुठल्या ना कुठल्या रूपात दु:ख देत असतो.’
 
एक सुस्कारा तोडीत दमयंती म्हणाली, ‘खरं आहे बाई. पण माझा एकुलता एक मुलगा आहे गं. एवढा रूपवान, हुशार, बिझनेसमन, पण त्याचं मातेरं केलं हिनं. माहेरचे सोकलेत हिचे पैसे घ्यायला नि चैन करायला.’ चहा, खाणे होऊन दमंती गेली.
 
माझं विचारचक्र चालू झालं. निती आपल्याला खेळवीत असते. कधी कधी अगदी अंत पाहते. जीवनाला माणूस विटून जातो. संपवून टाकावं वाटतं जीवन. पण कुठे तरी आशा तेवत असते, त्यावर माणूस जगत राहतो. अशा श्रीमंतांनी विचार करावा आपल्याला खूप काही दिलं देवानं. दु:ख कमीच आहे. इतरांना किती दु:ख आहे. गरिबांनी म्हणावं, मला देवानं धट्टंकट्टं शरीर दिलं इतर पंगू, रोगी माणसांपेक्षा मी कितीतरी सुखी आहे. तसंच सर्वानीच आपलपेक्षा गरीब, दु:खी माणसांकडे पाहून विचार करावा, मी इतरांपेक्षा खूपच सुखी आहे. माणूस सुखासाठीच तर धडपडत असतो. 
 
ते सुख स्वत:च शोधायचं असतं. त्यालाच तर जीवन म्हणतात. आपल्या पदरी जे आलं त्याचं सुखात कसे रूपांतर करायचे हे शिकलं पाहिजे. यासाठी देवाला दोष न देता स्वत:ला बदलायला शिकलं पाहिजे. नशिबाने दिलेत ते सुखाचे क्षण वेचले पाहिजेत. ते आठवीत जगले पाहिजे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनले पाहिजे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments