Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीप देण्यात मुंबईकर आघाडीवर

Webdunia
बुधवार, 9 जुलै 2014 (17:18 IST)
हॉटेलमध्ये वेटर्सना टीप देण्यात यंदा देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 10 टक्क्याने कपात झाली असून याबाबत मुंबईने सर्वाधिक आघाडी घेतली असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

यावर्षी जेव्हा भारतीय सुटीमध्ये परदेश दौर्‍यावर होते तेव्हा या टीपचे प्रमाण भरपूर म्हणजे 30.7 टक्क्यांपर्यंत होते. मात्र 2013 पासून एका वर्षात टीपचे प्रमाण 97 टक्क्यांवरून 87 टक्क्यांवर घसरले आहे. याबाबत ट्रीप अँडव्हाझर कंट्री मॅनेजर निखील गंजू यांनी दिलेल माहितीनुसार, हॉटेलच्या बिलासमवेत आजकाल टीप देण्याचा ट्रेंड वाढत आहे. जर बिलात सेवा कराचा समावेश करण्यात आला असेल तर 60 टक्के ग्राहक हे टीप देत नाहीत.

याबाबत टीप देणार्‍या भारतातील तसेच परदेशातील 2 हजार भारतीय ग्राहकांबाबत अलीकडेच सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे 45.7 टक्के  ग्राहक हे काम टीप देत असतात तर 42 टक्के ग्राहक हे मिळणार्‍या सेवेवरच्या टीपबाबत निर्णय घेतात, असेही सर्वेक्षणात समोर आले आहे. अनेक हॉटेल्स तसेच रेस्टॉरंटमध्ये मदतीच्यादृष्टीने दिलेली सेवा हीच ग्राहकांना टीप्स देण्यास प्रवृत्त करत असते, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. टीप देणार्‍या शहरांमध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा सर्वात शेवटी क्रमांक लागत असून मुंबईने अलीकडेच यासंदर्भात चेन्नईला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. जेव्हा भारतीय परदेशात असतात तेव्हा टीप देण्याचे प्रमाण जास्त असते. याचे कारण म्हणजे 56 टक्के ग्राहकांना परदेशांमध्ये टीप देण्याची पध्दतच आहे असे वाटते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments