Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या पहिल्या डॉनचा बंगला 100 कोटींच्या घरात

Webdunia
सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (12:04 IST)
पेडर रोड येथील मुंबईचा पहिला डॉन असलेल्या हाजी मस्तान याच्या आलिशान बंगल्याचा लिलाव होणार असून आजच्या बाजारभावाने या बंगल्याची किंमत अंदाजे 90 ते 100 कोटींच्या घरात आहे. मात्र, या लिलावाला खो बसला आहे.
 
हाजी मस्तानच्या तीन मुली, हाजी मस्तानचा राइट हँड असलेल्या अब्दुल करीमची मुले याच्यामध्ये या बंगल्याच्या मालकीवरुन वाद होता. पण, आता मात्र हाजीचा दत्तक पुत्र सुंदरने या वादात उडी घेऊन बंगल्याच्या लिलावात खो घातला आहे. हाजी मस्तान हा कधीही गोळी न चालवणारा, कधीही ड्रग्ज आणि हत्यारांचे अवैध व्यवहार न करणारा तरी संपूर्ण मुंबईवर आपले वर्चस्व ठेवणारा कुप्रसिद्ध डॉन होता. त्याचा जास्तीत जास्त पैसा हा सोन्याच्या काळ्या बाजारातून आला होता. त्याची ओळख ‘गरिबांचा रॉबिनहूड’ अशीही होती.
 
हाजी मस्तानचा 1994 साली मृत्यू झाला. आपल्या मृत्यूआधी त्याने आपला बंगला त्याच्या तीन लेकींना म्हणजेच कमरुनिस्सा, मेकरुनिस्सा आणि शमशाद तसेच आपला राइट हँड असलेल्या अब्दुल करीमची तीन मुले शकील, समीर आणि रेहाना या तिघांना दिला. पण, पुढे त्यांनी खोटय़ा पॉवर ऑफ अँटर्नीमार्फत या बंगल्यावर ताबा मिळवल्यामुळे मस्तानच्या मुली त्याच्याविरोधात पोलिसात गेल्या. करीमच्या मुलांना पोलिसांनी अटकही केली होती. पुढे त्यांच्यात समेट होऊन हा बंगला विकून त्याचे हिस्से वाटून घेण्याचे ठरले.
 
आता या बंगल्याचा लिलाव होणार इतक्यातच हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर मस्तान याने या बंगल्याच्या लिलावाला विरोध केला आहे. हा बंगला म्हणजे माझ्या वडिलांची आठवण असून त्याचा लिलाव होऊ देणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे. या वादात आता तिसर्‍या पक्षाचा समावेश झाल्याने त्यात ट्विस्ट आला आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments