Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आला पावसाळा मोबाईल सांभाळा

वेबदुनिया
पावसाळ्यात इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांएवढीच मोबाईलची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. मोबाईलमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे तो बंद पडू शकतो किंवा कधी कधी पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी जाऊन जर मोबाईल बंद पडला असेल, तर त्याची वॉरंटी किंवा गॅरंटी कुणीही देत नाही आणि तो दुरुस्त होईलच याची शाश्वतीही कुणी देऊ शकत नाही. म्हणूनच पावसाळ्यात या आपल्या महत्वपूर्ण वस्तूची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. 

मोबाईलची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स

1. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बाहेरून जरी पावसाचे पाणी आत गेले नाही, तरी आतील इलेक्ट्रॉनिक्स सर्किट मॉईश्चरायज होते. त्यामुळे मोबाईलचा एलसीडी डिस्प्ले किंवा बॅटरी खराब व्हायची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोबाईल रात्री बंद ठेवावा.

 
WD
2. पावसाळ्यात शक्यतो आपला मोबाईल प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये ठेवावा. आजकाल अनेक ट्रेंडी मोबाईल फोन कव्हर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईल प्लॅस्टिक कव्हरमध्ये ठेवल्यास पावसाच्या पाण्यापासून त्याचे संरक्षण होईल.

3. जर चुकून पावसाचे पाणी मोबाईलमध्ये गेलेच, तर त्वरित तो बंद करावा. त्यातील बॅटरी, सीम कार्ड, मेमरी कार्ड बाहेर काढावे.

4. जर चुकून जास्तीच पाणी मोबाईलमध्ये गेले असेल, तर घरातील टेबल लॅम्प किंवा ड्रायरने मोबाईलमधील पाणी पूर्णपणे सुकवावे. जोपर्यंत त्यातील पाणी सुकत नाही, तोपर्यंत फोन सुरू करू नये.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments