Marathi Biodata Maker

चित्रपट समीक्षा : डोंबिवली रिटर्न

Webdunia
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (16:13 IST)
जगण्यासाठी काय आवश्यक असतं, पैसा की नीतिमत्ता? प्रत्यक्षात या दोन्हीची समप्रमाणात आवश्यकता असते. या दोन्हीचा समतोल साधला गेला की आयुष्य सुखा-समधानाने शांतपणे जगता येतं. अर्थात केवळ नीतिमत्ता असेल आणि पैसा नसेल, तर रडतखडत का होईना पण जगता येतं. परंतु केवळ पैसा असेल आणि नीतिमत्ता नसेल, तर मात्र जगण्याची जी काही वाताहत किंवा परवड होते तिला तोड नसते. जो 'डोंबिवली रिटर्न'मधील अनंत वेलणकरचा होतो.
 
खरंतर अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) म्हणजे एकदम पापभिरु माणूस. मूळचा विदर्भातला पण, आता डोंबिवलीला बायको (राजेश्र्वरी सचदेव), मुलगी आणि भावाबरोबर (अमोल पराशर) राहाणारा. नोकरीला मंत्रालयात जनसंपर्क विभागात. मात्र मंत्रालयात काम करूनही वरकमाईची कसलीही अपेक्षा न ठेवणारा आणि कुणी द्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यापासून चार हात लांब पळणारा. एकूण अनंत वेलणकर म्हणजे नीतिमत्तेचा सगुण-साकार पुतळा, आहे त्यात समाधान मानून जगणारा, कुटुंबसुख पुरेपूर उपभोगणारा. मात्र एक दिवस त्याच्या हाताला अचानक एक पुरावा लागतो. राजकारणात दबदबा असलेल्या दादासाहेबांनी कुणा एकाची हत्या घडवून आणल्याचा. वास्तविक दादासाहेब अनंतचे आवडते नेते. त्याची त्यांच्यावर अतीव श्रद्धा. त्यामुळेच तो आपल्याकडील पुरावा दादासाहेबांना नेऊन देतो. त्याबदल्यात दादासाहेब त्याला भरपूर पैसे, मुंबईत घर... असं बरंच काही देऊ करतात. परंतु पापभिरू आणि सच्छील असलेला अनंत वेलणकर सगळ्याला नकार देतो. पण हा नकारच त्याला भारी पडतो. कारण नीतिवान माणूसच कुण्याही राजकारण्यासोरचीसगळ्यात मोठी समस्या असतो. साहजिक दादासाहेब आपल्या माणसांकरवी असं काही मायाजाल विणत जातात की अनंत त्यात अडकत तर जातोच, परंतु पैशांपासून चार हात लांब असलेला अनंत पैशांच्या मागे लागतो आणि त्यात त्याचं स्वतःचं स्वास्थ्य तर हरवतंच, वर कौटुंबिक सुखालाही तो दुरावतो. अनंतच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, तो होत्याचा नव्हता होतो. आयुष्यात पैसा नसताना सुखात जगणार्‍या अनंताचं, आप पैसा आल्यावर नेमकं काय होतं, ते कळायला हवं असेल तर हा सिनेमा पाहाण्याशिवाय गत्यंतर नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

कोण होते दादासाहेब फाळके? ज्यांच्या नावाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो

अल्लू अर्जुनपासून ते हृतिक रोशनपर्यंत, भारतातील टॉप ट्रेंडसेटिंग डान्सिंग सुपरस्टार्स

Shri Laxmi Narsimha Nira Narsingpur श्री क्षेत्र नीरा नृसिंहपुर पुणे

भारतीय मनोरंजन उद्योगातील एक प्रभावी शक्ती संजय लीला भन्साळी यांची ७ अविस्मरणीय नृत्य दृश्ये जी मनाला भिडतात

पती पत्नी और वो दो' गोंधळ आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल, आयुष्मान खुरानाने केला खुलासा

पुढील लेख
Show comments