Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्न करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या

marriage
Webdunia
शनिवार, 9 जुलै 2022 (12:31 IST)
गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी केला जाणारा संस्कार म्हणजे विवाहसंस्कार होय. याला 16 संस्कारात स्थान दले आहे. याचा मुख्य उद्देश्य 'जीवनाला संयमाने बांधून अपत्यसुख प्राप्ती करून जीवनातल्या सगळ्या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी व मोक्षासाठी कर्म करावे', हा आहे.
 
यासाठीच लग्नासंबंधी काही नियम बनवले गेले आहेत. ते असेः
 
1. वधू व वर सगोत्रीय (एका गोत्राचे) नकोत.
2. वधूचे गोत्र व मुलाच्या (वराच्या) आजोळचे गोत्रही एक नको (इथे कुळ ही संकल्पना अपेक्षित आहे).
3. दोन सख्ख्या बहिणींचा विवाह सख्ख्या भावांशी करणेही शास्त्राने निषिद्ध मानले आहे.
4. दोन भावांच्या दोन बहिणींच्या किंवा बहीण भावांच्या लग्नात 6 महिन्यांचे अंतर असावे (एका मांडवात 2 सगोत्रीय विवाह नकोत).
5. घरात विवाहानंतर 6 महिन्यांच्या आत डोहाळजेवण, जावळ, मुंज या सारखी मंगलकार्ये करू नयेत. पण जर 6 महिन्यात संवत्सर बदलत असेल तर कार्य केले जाऊ शकते.
6. लग्न किंवा इतर मंगलकार्यात श्राद्धादी कर्मे करू नयेत असे शास्त्र सांगते.
7. जर ग्रहमुख (ग्रहयज्ञ) झाल्यावर वधू किंवा वराच्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास वधुवर व त्यांचे मातापिता यांना सुतक लागत नाही. तसेच ठरलेल्या तिथीला लग्न केले जाऊ शकते.
8. वाङनिश्चय किंवा साखरपुड्यानंतर परिवारात कोणाचा मृत्यू झाल्यास सुतक संपल्यावर किंवा सव्वा महिन्यानंतर लग्न करण्यास कोणताही दोष नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अन्वयव्यतिरेक

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

श्री विठ्ठल मंदिर हंपी कर्नाटक

आरती बुधवारची

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments