Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय ज्योतिषानुसार जोडीदाराची निवड

Webdunia
लग्न ही आपल्या समाजातील एक खूप मोठी घटना असते. केवळ ती व्यक्ती किंवा कुटुंबासाठीच नव्हे तर विवाहसंस्था आपली आद्य सामाजिक संस्था आहे. त्यामुळे लग्न करणे आणि आपल्याला अनुरूप जोडीदार शोधणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र व संख्याशास्त्राचा वापर करून तुम्ही आपला जीवनसाथी शोधू शकता.

भारतीय ज्योतिषामध्ये जन्मतारीख, वेळ व स्थानाचा वापर करून जन्मपत्रिका किंवा कुंडली बनवली जाते. दोन व्यक्तींची जन्मपत्रिका जर जुळली तर त्यांच्या लग्नाला मान्यता मिळते. यासाठी ३६ गुणांमध्ये त्या पत्रिका जुळतायत की नाही हे पाहिले जाते. अर्धे किंवा अध्र्यापेक्षा अधिक गुण जुळत असतील तर ती पत्रिका जुळली असे मानले जाते.

१८ ते २७ गुण जुळलेले विवाह यशस्वी होतात असे मानतात. गुणांच्या माध्यमातून स्वभाव, मते, आवडीनिवडी, आकर्षण, भाग्य किंवा हानी, एकमेकांतील प्रेम, संतती याबद्दल आडाखे बांधले जातात. इतकेच नव्हे तर ग्रहांची अनुकूलता हाही एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रहांची सौम्यता, उग्रपणा हेही पाहिले जाते. एखाद्या व्यक्तीचे ग्रह क्रूर व उग्र असतील तर त्याचा जोडीदार सौम्य किंवा मृदू नसावा कारण उग्र व्यक्तीच्या संपर्कात येऊन त्याचेही ग्रह उग्र बनून त्यांचे गृहस्थाश्रम नष्ट होण्याची शक्यता असते.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments