Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गायीला स्पर्श केल्याने ग्रह दोष दूर होतात

cow2
Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:51 IST)
जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, व्यवसाय मंदावला असेल, घरात पैसा टिकत नसेल, तुम्हाला आजार होत असतील किंवा कौटुंबिक त्रासामुळे घरातील शांतता भंग पावत असेल, तर त्याचे कारण ग्रहदुष्टी असू शकते.
 
गायीमध्ये सर्व देवी-देवता वास करतात हे सर्वमान्य सत्य आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रत्येक बुधवार आणि शनिवारी नियमितपणे गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंदाचा संचार होईल. गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याचा हा प्रयोग कमीत कमी तीन महिने तरी करायचा आहे आणि यापुढेही चालू ठेवला तर जीवन सुख-समृद्धीने भरभरून जाईल हे लक्षात ठेवा.
 
शास्त्रांमध्ये असे काही मुद्दे सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही घरातून बाहेर पडताना तुमचा दिवस कसा जाईल हे समजू शकता.
 
जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि समोर एखादी गाय आली तर अशा वेळी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यांचा जीवनात अवलंब केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील आणि ग्रह दोषांचे दुःख दूर होईल.
 
सर्व धर्मग्रंथांमध्ये गाय ही पूजनीय आणि पवित्र मानली गेली आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवता वास करतात असे मानले जाते. गाय दिसली की पाठीवर हात फिरवावा. गाईच्या संगोपनाने ती प्रसन्न झाली तर आपले अनेक ग्रह दोष दूर होतात.
 
असाध्य रोग देखील दररोज फक्त गाईची काळजी घेतल्याने बरे होतात. हा प्रयोग किमान 12 महिने करणे आवश्यक आहे. कुठेही जाताना वाटेत गाय दिसली तर तिला उजव्या बाजूने जाऊ द्यावे. असे केल्याने गायीची प्रदक्षिणा होते. ज्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते.
 
शास्त्रात सांगण्यात आले आहे की, ज्या घरामध्ये गाय राहते तसेच गाईची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात.
 
गाईच्या सेवेतून किती फायदा होतो, हे श्रीकृष्णाच्या जीवनातून सिद्ध होते. भगवान श्रीकृष्ण गोपाळ झाले, कारण त्यांनी गाईची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि गाईच्या सेवेचे महत्त्व सांगितले. ज्योतिषाचार्यांच्या मते नवग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीची सेवा केलीच पाहिजे, जीवन सुखी होतं.
 
शास्त्रानुसार गायीमध्ये सुरभी नावाची लक्ष्मी वास करते. सुरभीचा अर्थ आहे - अतिशय सुंदर आभा प्रदान करणारी देवी. गाईपासून मिळणारे दूध, शेण, मूत्र, तूप, दही या सर्व गोष्टी जीवनासाठी उपयुक्त आहेत. गाईच्या डोक्यातून वाहणाऱ्या घामाला गोरोचन म्हणतात. गोरोचनमध्ये लक्ष्मीची प्राप्ती करण्याची क्षमता आहे. यामुळेच ज्या घरात गाय ठेवली जाते. त्या घरात 33 कोटी देवता प्रसन्न राहतात. तेथे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष कोणताही उपाय न करता आपोआप दूर होतो.
 
गाईची सेवा केल्याने तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे पुण्य प्राप्त होते. शास्त्रात गाईचा अपमान करणाऱ्याची कठोर निंदा करण्यात आली आहे. गायीचे मांस खाणार्‍यापेक्षा मोठा पापी या जगात कोणीच असू शकत नाही. शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की गाय मारणे हे पाप आहे ज्याचे प्रायश्चित्त नाही. तीर्थक्षेत्री जाऊन किंवा अनेक यज्ञ करून जे पुण्य गोळा केले जाते, ते सर्व पुण्य गायीच्या सेवेनेच प्राप्त होते.
 
गाईशी संबंधित शुभ संकेत
गायीचं दारात येऊन आवाज देणे, दार चाटणे हे सर्व शुभ आहेत. प्रवासाला जाताना गाय दिसणे शुभ असते. घराच्या अंगणात काढलेल्या रांगोळीवर गाईचा पाय ठेवणे खूप शुभ मानले जाते. रोज गाईला अन्नदान केल्याने नवग्रहांना शांती मिळते.
सर्व देवी-देवता गाई मातेत वास करतात.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, सर्व तीर्थक्षेत्रे गाईच्या चरणी वास करतात असे मानले जाते. जो व्यक्ती नियमितपणे गाईच्या पायावर मातीचा तिलक लावतो, त्याला कोणत्याही तीर्थस्थानी जाण्याची गरज नाही, कारण त्याला सर्व फळ एकाच वेळी मिळतात.
गाईच्या शेपटीला फक्त स्पर्श केल्याने मुक्तीचा मार्ग मोकळा होतो, असाही पुराणात उल्लेख आहे.
सकाळी उठल्यानंतर नियमितपणे गाय मातेचे दर्शन घेणारा व्यक्ती अकाली मरू शकत नाही, हे महाभारतात मोठ्या प्रमाणाने सांगितले आहे.
 
या मंत्राने गाई मातेला नमन करावे. 
सर्वदेवमये देवी सर्वदेवैर्लंकृते ।
मातरम्माभिषितं सफलं कुरु नंदिनी । 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi अक्षय तृतीया शुभेच्छा

श्री देवीची आरती

Parashuram Jayanti भगवान परशुराम मंदिर ग्वाल्हेर

श्री परशुराम माहात्म्य संपूर्ण अध्याय (१ ते ३३)

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीला हा खास भोग अर्पण करा, धनाचे दरवाजे उघडतील

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments