तुमची शारीरिक आणखी मानसिक शक्ती इतरांना लाजवेल अशी असते. कठीण प्रसंगात हार न मानणे. नाराज न होणे. हेच सद्गुण तुमचे आयुष्य तारायला संकटाना मारायला पुरेसे असते. म्हणूनच तुमच्या धाडसाचा इतरांना हेवा वाटतो.
पहिला हार्ट अटॅक येऊन गेल्यावर अजून दोन शिल्लक आहेत, तोपर्यंत इकडची दुनिया तिकडे करून ठेवीन असे म्हणणारे तुम्ही दुःखात खचून न जाता मरणालाही हसत सामोरे जाण्याची धडाडी ठेवतात.
इतरांवरती टीका करणे, राग आवरणे, दुसऱ्यांचे मन जाणून घेणे, तडजोड हा प्रकार तुमच्याकडे थोडा कमीच. स्वतः बद्दल आत्मविश्वास त्यामुळे काय होते इतरांचे दोष दिसतात. त्यामुळे तुमची एकाकी होण्याची दाट शक्यता असते.