Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिथीनुसार आहार-विहार

Webdunia
* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो. 
* द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे.
* तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात.
* चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो.
* पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो.
* षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही.
* सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते.
* अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो.
* नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे.
* दशमीच्या दिवशी कलंबी खाणे निषेधार्ह आहे.
* एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे.
* द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे.
* त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे.
* चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे.
* रविवारी आले खाऊ नये.
* कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते.
* उभे राहून पाणी प्यायला नको.
* जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते.
* ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाह ी.

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments