Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'पितृदोषा'च्या शांतीसाठी सोपे उपाय...

वेबदुनिया
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी व जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही. कुंडलीअभावी पितृदोष आहे किंवा नाही, याचे निदान होणे कठीण असते. मात्र यावरही जोतिषशास्त्रात तोडगा सांगितला आहे. आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांचे सुक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे असले म्हणजे झाले. त्याआधारे आपल्याला पितृदोष आहे क‍िंवा नाही, हे आपणच स्वत: ओळखू शकतो.

1. कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडणे. त्यांच्या प्रचंड मतभेद असतील. विचार बिल्कुल जमत नसतील. 

2. मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत नेहमी‍ बाधा उत्पन्न होत असतील. किंवा जुळलेला लग्न मोडले असेल. कुंडली जुळत असेल परंतु काही कारणात्सव विवाह जुळत नसेल.

3. विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरात पाळणा न हलने. वारंवार गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

4. कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

5. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे. व्यापार व व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती कुंटणे. 

6. कुटूंबातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

7. खराब-खराब स्वप्न फिरणे.

वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशां‍ती लाभते.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments