Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips : किडनी निकामी झाल्यावर शरीरात दिसतात हे 5 लक्षण, जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (22:38 IST)
किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे किडनी  रक्त शुद्ध करते. शरीरातील विषारी द्रव्ये मूत्राद्वारे बाहेर काढणे हे किडनी चे कार्य आहे. किडनी इलेक्ट्रोलाइट्सची पातळी नियंत्रित करते. किडनीद्वारेच शरीरात मीठ, पाणी आणि खनिजे संतुलित राहतात. किडनीमध्ये असलेले लाखो फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
 
शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवाची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैली आणि आहारातील बदल आवश्यक आहेत. तेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्याने तुमची किडनी फॅटी होऊ शकते, या प्रकारच्या आहारामुळे किडनीवर सतत अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते.
 
जेव्हा आपली किडनी नीट काम करत नाही, तेव्हा आपल्या शरीरात त्याची लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा समस्या वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया शरीरातील किडनी निकामी होण्याची लक्षणे कोणती आहेत.
 
1 जास्त लघवी होणे - किडनीची  समस्या असल्यास त्याचा पहिला परिणाम लघवीवरच होतो. सहसा, लघवी दिवसातून 8-10 वेळा येते, परंतु यापेक्षा जास्त लघवी हे किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकतात. काही वेळा लघवीत जळजळ आणि लघवीत रक्त येण्याची समस्याही उद्भवते.
 
2 भूक न लागणे आणि वजन कमी होणे- किडनी निकामी झाल्यामुळे भूक कमी होते आणि रुग्णाचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. या समस्येमुळे रुग्णाला नेहमी पोट भरलेले जाणवते.
 
3 पायांना सूज येणे- किडनी  शरीरातील अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करते. किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात सोडियम जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते. या विषाचा परिणाम डोळ्यांवर आणि चेहऱ्यावरही दिसून येतो, पण जास्त परिणाम पायांवर होतो.
 
4 कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा- किडनी निकामी झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. त्वचा कोरडी होते आणि त्वचेला खाज येण्याची समस्या देखील उद्भवते.
 
5 झोप न लागणे आणि अस्वस्थता जाणवणे -ज्या लोकांना किडनीचा त्रास होतो, त्यांची झोपेची पद्धतही बिघडू लागते. झोपेच्या कमतरतेमुळे, कधीकधी अस्वस्थता जाणवते. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments