Dharma Sangrah

थंड आणि बहुपयोगी वाळ्याचे औषधी गुणधर्म…

Webdunia
उन्हाळा सुरू होताच आपण विविध थंड पेयांकडे वळतो. बाजरात मिळणारे विविध पेय अनेकदा आरोग्यास हितकारक असतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितल्यानुसार लिंबू, चंदन, कैरी, वाळा यांची पेय उन्हाळ्यात शीतल मानली जातात. बहुगुणी आणि उष्णतेच्या विकारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करणाऱ्या वाळा या घटकाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
 
-उन्हाळ्यात माठात वाळा टाकल्यास पाण्याला छान सुगंध येतो आणि पाण्यातील दोष निघून जाण्यासही मदत होते.
 
-वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. तसेच हे पाणी थंड व सुगंधी होते.
 
-वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो.
 
-अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो.
 
-मूत्र विसर्जनावेळी आग, जळजळ होणे, प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.
 
-घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात.
 
-त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात
 
-अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

दररोज एक आवळा खाल्ल्याने तुमच्या केसांमध्ये आणि डोळ्यांमध्ये हे ७ मोठे बदल होतील

परदेशात फार्मसीचा अभ्यास करायचा असेल तर हंगरी उत्तम पर्याय असू शकतो, अधिक माहिती जाणून घ्या

होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि त्वचेवर तूप आणि खोबरेल तेल लावण्याचे फायदे

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Parenting Tips:मुले त्यांच्या पालकांपासून दूर जाण्याचे मुख्य कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments