काही लोकांना नीट भूक लागत नाही. त्यामुळे असे लोक वेळेवर जेवत नाहीत. त्यामुळे अशक्तपणा येऊ लागतो.
* काळ्या मिठाने गॅसेसची समस्या कमी होते आणि भूक वाढते. पोटही साफ राहते.
* हिरड्याचे चूर्ण, सुंठ, गूळ, सैंधव मीठ एकत्र घेतल्यानेही ही समस्या दूर होते.
* सैंधवमीठ, हिंग, ओवा आणि त्रिफळा हे सर्व समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे. चूर्णाएवढाच गूळ त्यात मिसळावा आणि त्याच्या छोट्या गोळ्या कराव्यात. जेवणानंतर एक-दोन गोळ्या घ्याव्यात.
* सफरचंदान भूक वाढून रक्त शुद्धी होते.
* हिरडा कडूनिंबाच्या निंबोण्यांबरोबर खाल्ला तर भूक वाढते. त्वचा रोग नाश होतो.
* हिरडा, गूळ, सुंठ यांचे चूर्ण करून थोड्या प्रमाणात ते मठ्ठ्याबरोबर घ्यावे.
* सुंठीचे चूर्ण तुपात मिसळून गरम पाणी प्यायल्यास चांगली भूक लागते.