Dharma Sangrah

....खरच आपण सुधारलोय का ?

Webdunia
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद 
चेहऱ्यावर पसरायचा
मग सुरू व्हायचं खाणं-पिणं
गप्पाटप्पा, चेष्टा-मस्करी, चर्चा-चर्वण
एकच धमाल उडायची
दिवसदिवसभर
 
तेव्हा चेहरे वाचता यायचे
ओठच नव्हे, तर डोळेही बोलायचे
डोळेच नव्हे तर 
संपूर्ण देहबोलीच संभाषण होऊन जायची !
गळाभेटी, टाळ्यांनी
प्रेमाची कारंजी उडायची
 
निघताना ‘थांबा हो’, ‘बसा हो’
‘काय घाई आहे ?’ असा आग्रह
हस्तांदोलन, कपाळावर कुंकू
एखादी भेटवस्तू
नाहीतर काही वानोळा
दूर जाईपर्यंत हलणारे हात...
 
आता मात्र हे क्षण 
दुर्मिळ होत चालले आहेत
आता सगळा यांत्रिक मामला
भेटी-गाठींना असंख्य पर्याय आलेले 
नेटवर भेटा, बोला
नाहीतर तासन्‌तास बसा वाजवत 
मोबाईलवर 
शब्दांचे खुळखुळे !
 
....खरच आपण सुधारलोय का ?
सर्व पहा

नक्की वाचा

स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!

अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!

"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

सर्व पहा

नवीन

विकेंड ट्रिपसाठी Hidden Gems महाराष्ट्रात

नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' या नव्या गाण्यामुळे सोशल मीडियापासून ते कायदेशीर कारवाईपर्यंत वाद निर्माण झाला

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

अभिनेत्री आणि लेखिका नवनींद्र बहल यांचे निधन

पुढील लेख
Show comments