suvichar

....खरच आपण सुधारलोय का ?

Webdunia
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद 
चेहऱ्यावर पसरायचा
मग सुरू व्हायचं खाणं-पिणं
गप्पाटप्पा, चेष्टा-मस्करी, चर्चा-चर्वण
एकच धमाल उडायची
दिवसदिवसभर
 
तेव्हा चेहरे वाचता यायचे
ओठच नव्हे, तर डोळेही बोलायचे
डोळेच नव्हे तर 
संपूर्ण देहबोलीच संभाषण होऊन जायची !
गळाभेटी, टाळ्यांनी
प्रेमाची कारंजी उडायची
 
निघताना ‘थांबा हो’, ‘बसा हो’
‘काय घाई आहे ?’ असा आग्रह
हस्तांदोलन, कपाळावर कुंकू
एखादी भेटवस्तू
नाहीतर काही वानोळा
दूर जाईपर्यंत हलणारे हात...
 
आता मात्र हे क्षण 
दुर्मिळ होत चालले आहेत
आता सगळा यांत्रिक मामला
भेटी-गाठींना असंख्य पर्याय आलेले 
नेटवर भेटा, बोला
नाहीतर तासन्‌तास बसा वाजवत 
मोबाईलवर 
शब्दांचे खुळखुळे !
 
....खरच आपण सुधारलोय का ?
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर परदेशात हिट ठरला

वृंदावनची ५ सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे, या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

पुढील लेख
Show comments