बादशहा आणि बिरबल एकदा युमनेच्या वाळवंटात फिरायला गेले होते. तेव्हा यमुनेच्या प्रवाहाचा धीरगंभीर आवाज ऐकून बादशहाने बिरबलला विचारले, ''अरे बिरबल, ही यमुना अशी का बरे रडत असेल ? ''
यावर बिरबल म्हणाला, '' महाराज, माहेर सोडून सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच. आपला पती सागर याच्याकडे चाललेली यमुना रडली, तर त्यात कसले नवल? ''