Dharma Sangrah

लग्नाच्या पाच वर्षांनंतर...

Webdunia
गुरूवार, 31 मे 2018 (13:31 IST)
एका वेळेनंतर प्रत्येक नात्यात बदल होत असतात. सगळीच नाती नेहमी एकसारखी राहात नाहीत. काही बदल चांगले वाटतात तर काही बदल हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. नवीन लग्र झाल्यावर पती-पत्नी दोघेही आनंदी असतात. पण लग्नाच्या पाच वर्षांनंतर या नात्यात काही खास बदल बघायला ळितात.
 
हनीमून 
लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे हनीमून पिरीयडसारखं असतं. आजूबाजूला सगळंच चांगलं वाटत असतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, दोघेही हनीमून पिरीयडमधून बाहेर येऊ लागतात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने ते पाहायला लागतात. पण जे लोक या हनीमून मूडमधून बाहेर येत नाहीत, त्यांचं नातं अडचणीत येण्याची अधिक शक्यता असते.
दुसरं वर्ष
लग्नाच्या दुसर्‍या वर्षात पती-पत्नी एकेमेकांचे स्वभाव आणि एकमेकांच्या सवयी जाणून असतात. चांगल्या सवयीचं काही नाही, पण वाईट सवयीमुळे खटके उडायला लागतात. त्यामुळे सतत छोटी छोटी भांडणं होऊ लागतात. दुसर्‍या वर्षात आर्थिक आणि मानसिक अडचणी, तसेच फॅमिली प्लॅनिंग याचाही विचार असतो त्यामुळे रोमान्स जरा कमीच होतो.
बोलणं कमी 
लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर पती-पत्नी आपापल्या जबाबदार्‍यांमध्ये इतके गुंतले जातात की, त्यांना एकेकांसोबत बोलण्याची सवडच मिळत  नाही. दोघेही नोकरी करणारे असले की ही समस्या अधिक होते. घर आणि ऑफिसच्या धावपळीत ते आपलं नातं मागे सोडून आले असतात.
भांडणं
ज्या गोष्टी आधी खूप चांगल्या वाटायच्या त्या गोष्टींबद्दल काही काळानंतर चीड यायला लागते. मग यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं होतात. पण दोघांपैकी एकजण समजदार असेल तर भांडण पटकन सोडवलं जाऊ शकतं. पण तसं नसेल तर कठीण आहे.
आधीसारखं प्रेम
लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेम पूर्णपणे संपतं असं नाहीये. पण ते पूर्वीसारखं राहात नाही, ते कमी होतं. आधीसारख्या रोमॅटिंक डेट्‌स, सरप्राईज देणं, प्रमेच्या गोष्टी, अनेक तास सोबत बसणं हे कमी होतं.
संशयाचं भूत
नात्याचा पाया हा विश्र्वासावर रचला जातो. एकदा विश्र्वास गमवला तर नातं टिकवून ठेवणं जरा कठीण होऊन बसतं. आणि विश्र्वास कमी झाल्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरतं.
नमते घेणे
प्रेम असो वा लग्न भांडण झाल्यावर कुणी एकच सॉरी म्हणतो. एकाने सॉरी म्हटलं की, दोघांमधील वाद संपतो. भांडण मिटतं. त्यामुळे दोघांपैकी एक असा असतोच जो आपली चुकी नसतानाही भांडण मिटवण्यासाठी सॉरी बोलतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

बकरीद (ईद-उल-अजहा) विशेष लोकप्रिय पाककृती

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतात हे आश्चर्यकारक बदल

इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरची मोठी संधी; बीटेकनंतर मिळतील आकर्षक नोकऱ्या

पुढील लेख
Show comments