Marathi Biodata Maker

जाणून घ्या, विवाहानंतर का जावे हनिमूनला?

Webdunia
सोमवार, 23 जुलै 2018 (16:29 IST)
विवाहानंतर हनिमूनला जाणे हे प्रत्येकालाच आवडते. लग्नानंतरचे रिती-रिवाज पूर्ण झाल्यावर त्वरित याचे नियोजन केले जाते. पूर्वी देशातील एखाद्या ठिकाणाला पसंती दिली जात असे. परंतु, आजकाल अनेक जोडपी परदेशाची निवड करताना दिसत आहेत. काहीजण याकडे एक एंजॉय म्हणून पाहतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या रिलेशनमध्ये हे खूप महत्त्वाची भूमिका निभावते.
 
विवाह झाल्यानंतर दाम्पत्य बंधनात अडकतात, त्यांच्यावर घरातील मंडळी किंवा समाजाची काही बंधने येतात. तसेच घरात सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. परंतु, तुम्ही जेव्हा हनिमूनला जाता तेव्हा तेथे कोणाचेही बंधन नसते, एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो. रिलॅक्‍स होण्यासोबत एकत्र वेळ घालविण्यास मिळतो. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते.
एकत्र वेळ घालविल्याने दोघांमध्ये आदराची भावना निर्माण होते. आयुष्यभर आपण एकमेंकाना कायम साथ देऊ, असे दोघेही आश्वासन देतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी ही वेळ खूप परफेक्‍ट आणि महत्वाची आहे.
 
एकमेकांबद्दल माहिती मिळाल्याने, एकत्र वेळ घालविल्याने समजून घेण्यास अडचणी येत नाहीत.
ज्यावेळी आपण घरी कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत असताना त्यांच्यासोबत वेळ घालवता. त्यांच्याकडेच पार्टनरपेक्षा अधिक लक्ष असते. मात्र, हनिमूनच्या वेळी तुम्ही दोघच असता, त्यामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी, पसंती-नापसंती याबाबत जाणून घेता येतात.
 
विवाहानंतर आपण प्रथम एकत्र बाहेर जात आहोत, ही आठवण मानाच्या कोपऱ्यात घर करणारी असते.
 
लग्नातील धावपळीमुळे विविध कार्यक्रमामुळे दोघेही थकलेले असतात. यामुळे थकवा दूर करण्यासाठी हनिमून हा चांगला पर्याय असतो.
 
ओनोख्या व्यक्तीशी एकरुप होण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरतो. याला प्रेम विवाह करणारे अपवाद ठरू शकतात. परंतु, आजही काही विवाह घरच्याच्या परवानगीने होतात. अशा दाम्पत्यांना भावनिकरित्या एकमेकांच्या जवळ येण्यास हे दिवस मदत करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी दररोज 1 केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Career Tips: ITI इलेक्ट्रिशियनमध्ये करिअर करा

केस लवकर तेलकट होतात, हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments