Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (15:50 IST)
काहीतरी तुज सांगावं, म्हणून कागदावर लिहिलं,
तू फक्त शब्दच वाचले, बाकी न तुज समजलं,
भावना माझ्या तुजपाशी न पोहोचल्या,
शब्दांत ही सांगू न शकले, लिहिलेल्या न समजल्या,
कळायला हवी न कधी अव्यक्त  कुणाची भावना,
हृदयात प्रेम असावं लागतं, बोलायची गरज नसावी ना!
अबोलचं राहीले माझे प्रेम, न कधी बोलले ,
हृदयातच राहीले मिटून, कधी न उमलले,
आतां मज असं वाटे, बोलावयास हवं होतं !
पण नसेलच तू माझा, म्हणून च तसं घडत होतं!
अंतरी अजूनही ती सल आहे,मज बोचते,
एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!
..अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments