Festival Posters

अशोकस्तंभ

Webdunia
राष्ट्रपती भवनातील प्रशस्त दरबार हॉलमध्ये विसाव्या शतकातील पहिला राष्‍ट्रीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी लोकांनी दरबार हॉलच्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण आणि सर्वांच्या मुखातून गांधीजींच्या नावाचा जयघोष चालला होता. त्या दिवशी हजारो लोकांनी राजघाटावर जाऊन गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती भवनाचा परिसर गांधीजीं व 'वंदे मातरम्' च्या घोषणेने दुमदुमला होता. कार्यक्रमासाठी गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार पटेल, पहिले लोकसभा अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि मनात एकच विचार येत होता की, आज गांधींजी असते तर......

NDND
यावेळी प्रथमच अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह दरबारात आणले गेले. ब्रिटीश सरकारच्या काळात व्हॉइसरॉय बसत असलेल्या गादी शेजारी अशोकस्तंभ ठेवण्यात आला. तसेच गौतम बुद्धाची प्रसन्न प्रतिमा गादीमागे पहिल्यांदाच ठेवण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दरबार हॉमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर लोकांना अभिवादन केले. आपल्या सर्वांसाठी हा एक अवस्मरणीय क्षण असून आपण राष्ट्रपिता व इश्वराचे आभार मानून सुरवात करू असे डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी हिंदी आणि इंग्रजीत केलेल्या भाषणात सांगितले होते.

NDND
राष्ट्रपित्याने जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला. त्या दिवशी देशवा‍सियांनी पहिला प्रजासत्ताक दिन प्रभात फेरी काढून साजरा केला. दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही लहान लहान चिमुकलेदेखील घराबरोबर पडले होते. त्यांनी हा राष्ट्रीय सण आनंदाने साजरा केला होता.

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments