Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार साहित्य महामंडळावर बंधन घालणार

वेबदुनिया
शनिवार, 21 मार्च 2009 (19:42 IST)
WDWD
अध्यक्षांविना होणारे येथील मराठी साहित्य संमेलन सुरू झालं असलं तरी वाद काही संपलेले नाहीत. उलट नवनवीन वाद जन्माला घातले जात आहेत. या वादाला कंटाळून या संमेलनाला निधी पुरविणारे महाराष्ट्र शासन आता संमेलनाचे आयोजन करणारे मराठी साहित्य महामंडळ व इतर संबंधित संस्थांवर काही बंधन घालण्याचा विचार करत आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनौपचारिक चर्चेत ही माहिती दिली. राज्य शासन या संमेलनासाठी पन्नास लाखाचा निधी देते. त्यामुळे या संमेलनाच्या यशापयशाबाबत लोक सरकारला जाब विचारू शकतात. म्हणूनच या संमेलनात वाद होऊ नये म्हणून आम्ही या संमेलनाचे आयोजन करणार्‍या संस्थांना काही बंधने घालण्याचा विचार करू असे पाटील प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणेही उपस्थित होते.

दरम्यान, महाबळेश्वर संमेलनात उडालेल्या गोंधळाबद्दल अनेक मान्यवर साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पदावरून जायला पाहिजे असे सांगून, सुमार बुद्धिच्या आणि साहित्यिक नसणार्‍या ठाले-पाटलांना या पदावर रहाण्याचा काहीही हक्क नाही. त्यांनीच हा सर्व गोंधळ घातल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments