Dharma Sangrah

सरकार साहित्य महामंडळावर बंधन घालणार

वेबदुनिया
शनिवार, 21 मार्च 2009 (19:42 IST)
WDWD
अध्यक्षांविना होणारे येथील मराठी साहित्य संमेलन सुरू झालं असलं तरी वाद काही संपलेले नाहीत. उलट नवनवीन वाद जन्माला घातले जात आहेत. या वादाला कंटाळून या संमेलनाला निधी पुरविणारे महाराष्ट्र शासन आता संमेलनाचे आयोजन करणारे मराठी साहित्य महामंडळ व इतर संबंधित संस्थांवर काही बंधन घालण्याचा विचार करत आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनौपचारिक चर्चेत ही माहिती दिली. राज्य शासन या संमेलनासाठी पन्नास लाखाचा निधी देते. त्यामुळे या संमेलनाच्या यशापयशाबाबत लोक सरकारला जाब विचारू शकतात. म्हणूनच या संमेलनात वाद होऊ नये म्हणून आम्ही या संमेलनाचे आयोजन करणार्‍या संस्थांना काही बंधने घालण्याचा विचार करू असे पाटील प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणेही उपस्थित होते.

दरम्यान, महाबळेश्वर संमेलनात उडालेल्या गोंधळाबद्दल अनेक मान्यवर साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पदावरून जायला पाहिजे असे सांगून, सुमार बुद्धिच्या आणि साहित्यिक नसणार्‍या ठाले-पाटलांना या पदावर रहाण्याचा काहीही हक्क नाही. त्यांनीच हा सर्व गोंधळ घातल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंडा दूर करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

वजन कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स अवलंबवा

गुडघे किंवा पायाच्या समस्या आहे, हे योगासन करा

प्रेरणादायी कथा : राजा आणि चिमणी

हिवाळ्यातील सुपर ड्रिंक गाजर ज्यूस रेसिपी

Show comments