Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Teachers Day 2021: भारतात पहिल्यांदा कधी साजरा केला गेला शिक्षक दिन

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (10:02 IST)
मुलांच्या जीवनात त्यांच्या शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. एक शिक्षक मुलांना ज्ञानच देत नाही तर जीवनातील महत्त्वाचं पाठ देखील समजावून सांगतात. शिक्षणचं व्यक्तीला जीवनात प्रगतीच्या मार्गावर नेतं. दरवर्षी शिक्षकांच्या सन्मानात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जाणून घ्या या दिवशीचा इतिहा आणि महत्तव-
 
भारतात पहिला शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आला
भारतात पहिला शिक्षक दिन १९६२ मध्ये साजरा केला गेला. भारताचे माजी राष्ट्रपति आणि महान शिक्षाविद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला होता. हा दिवस साजरा करण्यासाठी एकदा राधा कृष्णन यांच्याकडे त्यांचे काही शिष्य आले आणि त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली तेव्हा राधा कृष्णन यांनी म्हटले की माझा वाढदिवस वेगळ्याने साजरा करण्यापेक्षा जर शिक्षक दिन या रुपात साजरा केला जाईल तर मला जास्त गर्व होईल. यानंतर 5 सप्टेंबर हा दिवस टीचर्स डे रुपात साजरा होत आहे. 
 
इतिहास आणि महत्व
इतिहासबद्दल सांगायचं तर पहिल्यांदा टीचर्स डे 60 च्या दशकात साजरा केला गेला होता. सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी म्हटलं होतं की पूर्ण जग एक विद्यालय आहे जिथे काही न काही शिकायला मिळतं. शिक्षक केवळ शिकवत नाही तर आम्हाला जीवनातील अनुभवातून निघता असताना चांगल्या आणि वाईट यात फरक करणे देखील शिकवतात.
 
शिक्षकांचा सन्मान
या दिवशी शाळेत तसंच कॉलेजमध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सन्मान करुन हा दिवस साजरा करतात. आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देतात, त्यांच्याकडून शिकलेलं अनुभव सांगतात, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. कारण शिक्षक मनुष्याच्या जीवनातील अत्यंत महत्तवाची व्यक्ती असते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments