Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायम स्वरूपी वास्तव्य करेल

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:36 IST)
दाराच्या चौकटीच्या खालील लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा, डेहरी म्हणतात. वास्तू शास्त्रात याचे खूप महत्त्व आहे. याबद्दल खास 5 गोष्टी आणि याचे 5 फायदे. 
 
वास्तू उपचार - 
1 वास्तुनुसार उंबरा किंवा उंबरठा भंगलेला किंवा तुटलेला नसावा.
2 विखुरलेला किंवा या दृच्छिक उंबरठा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतं.
3 दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा.
4 बऱ्याच ठिकाणी उंबरा नसतो हा एक वास्तू दोष असतो. कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उंबऱ्याला पार करूनच घरात यावे.
 
धन प्राप्ती -
1 घराची स्वच्छता करून दररोज उंबऱ्याची पूजा करावी. जे दररोज नियमानं पूजा करतं त्यांचा घरात लक्ष्मी कायम स्वरुपी वास्तव्य करते.
2 दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबऱ्यावर तुपाचा दिवा लावावा. असे केल्यानं घरात लक्ष्मीचं येणं सोपं होणार.
3 एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबऱ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद-कुंकू वाहून निरांजन ओवाळावी.
4 देवाची पूजा केल्यावर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूस सतिया किंवा स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी. सतियावर तांदुळाचा ढिगारा रचून त्यावर एक-एक सुपारी वर कलावा बांधून ठेवा. या उपायाने धनप्राप्ती होते. 
 
असं करू नये -
1 उंबऱ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये.
2 उंबऱ्यावर कधीही पाय मारू नये.
3 आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबऱ्यावर स्वच्छ करू नये. 
4 उंबऱ्यावर उभारून कोणाचेही पाया पडू नये.
5 उंबऱ्यावर उभारून कोणाही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये. नेहमीच पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबऱ्याचा बाहेरून द्यावा.

संबंधित माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख दूर करा

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments