Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips : वास्तुशास्त्राच्या या गोष्टींची काळजी घ्या आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा

Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (22:32 IST)
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती मिळविण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवणे खूप आवश्यक आहे. आपण ज्या घरामध्ये किंवा वातावरणात राहतो त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की आपल्या घराच्या आसपास आणि घराच्या आत ठेवलेल्या वस्तूंचाही आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा तिथे आपल्याला बरे वाटत नाही किंवा आजारी पडतो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या घरात सतत तणाव आणि कलह राहिल्यास त्या घरातील लोक आजारी पडतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करते.  ते दूर करण्याचे उपाय जाणून घ्या.  
 
वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा कधीही ठेवू नये. घराच्या मुख्य दरवाजासमोर डस्टबिन ठेवल्याने घरात रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरासमोर डस्टबिन ठेवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
 
वास्तूनुसार घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी नियमितपणे संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावणे आवश्यक आहे. घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्यास उत्तम. घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
 
अनेक लोक आपल्या घराच्या सजावटीसाठी बनावट प्लास्टिकची झाडे घरात ठेवतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार प्लास्टिकची झाडे घरात ठेवू नयेत. या झाडांमुळे नकारात्मक उर्जेचा घरावर परिणाम होतो.
 
घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवण्यासाठी आपण आपले घर नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घरातील घाणीमुळे नकारात्मक ऊर्जेचे संचलन वाढते, परंतु जर आपण नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

संबंधित माहिती

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

पुढील लेख
Show comments