Festival Posters

पितृ नाराज असल्याचे संकेत समजून घ्या, अशा वेळी करा हे उपाय

Webdunia
आपल्या जीवनात सुख-शांती नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कधीही पैशाची कमतरता भासू नये यासाठी लोक कठोर परिश्रम देखील करतात, परंतु काहीवेळा कठोर परिश्रम करूनही एखाद्या व्यक्तीला यश मिळत नाही किंवा कष्ट करून पैसे मिळत नाहीत, परंतु या ना त्या कारणाने घरात तणाव आणि अशांतता कायम असते. पैसा येतो, पण लवकरच तो खर्चही होतो. याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा तुमचे मृत पूर्वज देखील घरातील समस्यांचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जाणूनबुजून किंवा नकळत तुमच्याकडून अशा काही चुका घडतात, ज्यामुळे तुमचे पूर्वज रागावतात आणि तुम्हाला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि जेव्हा पूर्वज रागावतात तेव्हा व्यक्तीला काही चिन्हे मिळू लागतात. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या लक्षणांमुळे पूर्वजांना राग येतो...
 
विनाकारण कलह
घरामध्ये विनाकारण कलह वाढत असल्यास पितृदोष असू शकतो. जर तुमच्या घरात विनाकारण भांडण होत असेल. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील तर ते पितृदोषाचे कारण असू शकते. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमचे पूर्वज काही कारणास्तव रागावले आहेत.
 
कामात अडथळे
जर एखाद्या कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा मेहनत करूनही तुम्हाला कोणत्याही कामात यश येत नसेल तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत.
 
विवाहात अडथळे
जर कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी विवाहयोग्य असतील, परंतु त्यांच्या विवाहात वारंवार अडथळे येत असतील किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत.
 
व्यर्थ नुकसान
वास्तु तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या कामात अचानक नुकसान होत असेल किंवा घरातील सदस्यांना पुन्हा पुन्हा अपघात होत असतील तर याचा अर्थ पितरांचा राग आला आहे.
 
पितृ दोषावर उपाय
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्याही महिन्यात अमावस्या, पौर्णिमा, त्रयोदशी आणि चतुर्दशी तिथींना घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तूप आणि गुळाची उदबत्ती लावा. यासोबतच सकाळी उठल्याबरोबर पितरांना नमन करा. अशाने पितृ प्रसन्न होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas Destinations 2025 ख्रिसमस दरम्यान ही ठिकाणे खास बनतात; नक्कीच भेट द्या

शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते

शनिवारची आरती

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments